प्रारब्ध, प्राक्तन, दैव, नशिब | जन्म व कर्म गुणसुत्रे

प्रश्न

प्रारब्ध, प्राक्तन, दैव, नशिब यात काही फरक आहे का? असेल तर काय?

थोडक्यात उत्तर

प्रारब्ध आणि प्राक्तन ह्या संज्ञा आहेत ज्या कर्मफळाच्या अवस्था दर्शवतात. दैव आणि नशिब हे भावना वाचक उद्गार आहेत जे मनाच्या अवस्था दर्शवतात. #मा_आ_वि #हिंदू #गूढ_ज्ञान #ज्ञान

मोठे उत्तर

जसे मानवी गुणसुत्र हे दोन प्रथिन मालिकांच्या धाग्याप्रमाणे एकमेकांत गुंतले आहे, तसे कर्म व जन्म हे एकमेकांसोबत अतिशय शास्त्रीय सफाईने गुंतले आहे.

त्यात दोन मुख्य संज्ञा लक्षात घेणे आवश्यक आहे.

  • निरुपक्रम कर्म: असे कर्म ज्याचे फळ लगेच परिणाम दाखवत नाही व ते विलम्बाने भविष्यात येतात.
  • सोपक्रम कर्म: असे कर्म ज्याचे फळ अवतीर्ण होऊ लागले आहे किंवा वर्तमान कालात घडत आहे.

आता याच्या जोडीला चार उपसंज्ञा लक्षात घेऊ या.

  1. संचित कर्मफळ: एका आत्मन च्या ब्रह्मापासुन वेगळे झाल्यानंतर सर्व कर्मफलांचा एकुण आशय किंवा साठा.
  2. क्रियमाण कर्मफळ: जे आत्म्याने प्रकृती सोबत केलेल्या दररोजच्या कर्मातुन जन्म घेते. यातील काही कर्म ताबडतोब फळ देऊन संपते. उरलेले कर्मफळ संचितात जमा होते.
  3. प्रारब्ध कर्मफळ: हे त्या संचितापैकीत असे कर्मफळ आहे, जे त्या आत्म्याच्या वर्तमान शरीरावर परिणाम करते किंवा करणार असते, जवळच्या भविष्यात, म्हणजेच वर्तमान देहाचा लय किंवा मृत्यु होण्या आधी.
  4. प्राक्तन कर्मफळ: हे त्या संचितापैकी असे कर्म आहे जे त्या आत्म्याच्या पुढल्या म्हणजेच भविष्यातील शरीरावर परिणाम करणार आहे. म्हणजेच त्याआत्म्याला पुन्हा शरीर धारण करायला हे कर्म कारणीभुत आहे.

आता या संज्ञा कशा चालतात ते बघू

एक आत्मन पहिले नवे शरीर घेतो तेव्हा संचित (प्राक्तन + प्रारब्ध) कर्मफ्ळ “शुन्य” घेऊन जन्मतो.

त्या शरीराने प्रकृती सोबतच्या केलेल्या कर्मापोटी क्रियमाण कर्म (लगेच फळ देणारी) भोगतो तसेच संचित कर्मफळे म्हणजेच “निरुपक्रम” कर्मफळे स्वतःवर जोडुन घेतो. त्याच्या नुसार दुसरे नवे शरीर धारण करतो.

आता हे दुसरे नवे शरीर ही संचितापैकी काही प्राक्तन कर्मफळे घेउन जन्म घेते झाले आहे.

या दुसऱ्या नव्या शरीरात आत्मन क्रियमाण कर्म करुन व त्याचे फळ लगेच भोगुन राहतो. त्यावेळेस प्राक्तनातील काही कर्म “सोपक्रम” अवस्थेस पोहोचतात व प्रारब्ध म्हणुन समोर येतात. तो आत्मा ती भोगुन संपवतो, तसेच क्रियमाण कर्म भोगतो. न भोगलेली नविन कर्मफळे संचितात जोडली जातात.

त्यातील काही प्राक्तन म्हणुन पुन्हा सोबत घेऊन तोआत्मान पुढला जन्म व तिसरे नवीन शरीर धारण करतो आणि हे जन्म कर्म चक्र चालु राहते.

आता पुढल्या दोन शब्दांकडे वळु

या सर्व चक्रा मध्ये आत्म्याला शरीर धारण केल्याच्या आनंदात मी पणा येतो व त्यामुळे त्याचे पुर्व जन्म स्मृतीत राहात नाही. त्यामुळे संचित (प्रारब्ध व प्राक्तन) कर्मफळे याची जाण नसते.

त्यामुळे अपेक्षा असताना (जी करणे हेच दुःखाचे कारण सांगितले आहे) फळ मिळाले नाही तर ती अपेक्षा भंगाची भावना “दैव” (समोर असलेले पण भोगता नाही आले असे फळ) म्हणतो.

त्याच प्रमाणे प्रारब्धाच्या परिणामामुळे अपेक्षा नसताना (जे पुर्वीच्या कर्माचे फळ आहे) ते फळ (भोग) वाट्यास आले तर त्याला “नशिब” म्हणतो.

दैव आणि नशिब हे बोली भाषेच्या बदलामुळे आलटुन पालटुन ही वापरले जातात.

मला वेगवेगळ्या पुस्तकातुन वाचुन समजलेला हा सारांश आहे. शास्त्रीय की अजुन काही आहे यावर मला वाद करणे अपेक्षित नाही.

@विभासा

फुलपाखरू

अशीच एक मस्त हवेशीर दुपार
पांढरे ढग अन् निळे आकाश समोर
येईल मग हळुच एक फुलपाखरू
पंखांची नाजूक हालचाल करत

इवलेसे हे पंख नितळ काळे
वर हलकेच शिंपडले ठिपके पिवळे
वाऱ्यावर तरंगत सुप्त दडली ओढ जोपासते
पाना पानावर कळी कळीवर टिपून बघते

कसं कळतं त्या चिमुकल्या जीवा
कुठे आहे मधाचा मेवा
कसा राहतो लक्षात त्याच्या
या इमारतीचा तोच मजला बारा

पाऊस पडतो कडक उन पडते
कामाचे फोन चालतात तास तास
पण तो एक क्षण मात्र येतो
मुक्या जीवाची जीवनाची क्षणभंगुरता

हलकेच मनः पटलावर रेखाटून जातो
नसेन उद्या मी जरी
तरी ही संपणार नाही
आहे आनंद एवढा त्या क्षणात

@विभासा

निर्गुण सगुण

निर्गुण सगुण प्रणवाकृती | एक असे हा गणपती |
रक्षावया भक्तांप्रती | अष्टस्थानी प्रगटला || १ ||

मयूर क्षेत्री उद्धरिला कमलासुर | सिद्ध टेकी हरिने तप केले घोर |
बल्लाळाचा केला उद्धार | पालीक्षेत्री प्रगटोनी || २ ||

महड क्षेत्री विनायक | प्रगटोनिया भक्त पालक |
दुष्ट दानव वधोनी सकळीक | मुनि द्विजासी रक्षीले || ३ ||

विधीने तप करिता स्थाव-भुवनी | तेथे प्रगटला चिंतामणी |
भ्रांती गेली निरसोनी | स्वसामर्थ्यासी लाधला || ४ ||

लेण्याद्री दिव्य पर्वती | पार्वत्यात्मज झाला श्री गणपती |
दानव मर्दोनि पापमति | रक्षण केले नगजेचे || ५ ||

ओझर क्षेत्री विघ्नहर | प्रगट झाला सर्वेश्वर |
भक्तांची संकटे केली दूर | समुळ विघ्ने वारोंनी || ६ ||

रांजणगावी श्री गणपती | प्रगट झाली श्री ब्रह्ममूर्ती |
आश्वासुनी सुरांप्रति | स्थापिले स्वपदी सर्वाते || ७ ||

शब्द रचना श्री गणेशोत्सव लोकमान्य आळी ठाणे येथून घेतली आहे

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने

श्री गणेशोत्सव, लोकमान्य आळी, ठाणे येथे गेली १०१ वर्षे हा १० दिवसांचा आरत्यांचा सोहळा चालू आहे.

यावर्षी कोविद-१९ विषाणूच्या संसर्गामुळे प्रत्यक्ष तेथे जाऊन आरती करणे हे मला शक्य नाही तरी त्या आरत्या खाली मांडून ठेवत आहे.

गणपती बाप्पा मोरया !!

लोकमान्य टिळकांची आरती

भारत भूमी मध्ये प्रसिद्ध महाराष्ट्र
स्वराज्य साम्राज्याचे गतआदिक्षेत्र ।
नवरत्नांचा सागर प्रसिद्ध सर्वत्र
तेथे अवतरले श्री गंगाधर पुत्र।। १ ।।

जयदेव जयदेव जय जय बलवंता
कृपा कराया दीनांवरी केव्हा येता ।। ध्रु ।।
जय देव जय देव

हिंदभूमीचा हा सौभाग्य तिलक
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ।
राष्ट्र सुत्रधारी लोकनायक
भारतमातेचा हा अनंत सेवक ।। २ ।।

उठा बंधुनो सोडाआळस कर्मकरा
स्वदेशभक्ती मार्गे त्यांची कास धरा ।
बाळदास होऊनी त्यांचा मार्ग धरा
सुराज्य प्राप्ती करून त्यांना शांत करा ।। ३ ।।

आरती शब्द श्री गणेशोत्सव लोकमान्य आळी, ठाणे येथून घेतले आहेत
गणपती समोर दर वर्षी १० दिवस ही टिळकांची आरती गेली असंख्य वर्षे गायली जाते. हा सार्वजनिक गणोशोत्सव १०१ वर्षे अविरत चालू आहे

मंत्र पुष्पांजली

ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्|

ते हं नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:

ॐ राजाधिराजाय प्रसह्ये साहिने | नमो वयं वैश्रवणाय कुर्महे

स मे कामान्कामकामाय मह्यम्| कामेश्वरो वैश्रवणो ददातु|

कुबेराय वैश्रवणाय | महाराजाय नम: ॐ स्वस्ति

साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी

स्यात्सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंता या एकराळिति

तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे

आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति

एकदंतायविद्महे वक्रंतुडाय धीमहि

शब्द माझी मराठी येथून घेतले आहेत

घालीन लोटांगण

घालीन लोटांगण, वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहीन रुप तुझें ।
प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन ।
भावें ओवाळीन म्हणे नामा ।।१।।

त्वमेव माता च पिता त्वमेव।
त्वमेव बंधुक्ष्च सखा त्वमेव ।
त्वमेव विध्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव।।२।।

कायेन वाचा मनसेंद्रीयेव्रा, बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात ।
करोमि यध्य्त सकलं परस्मे, नारायणायेति समर्पयामि ।।३।।
अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्र भजे ।।४।।

हरे राम हर राम, राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।

आरती शब्द भक्ति गाणे येथून घेतले आहेत

सत्राणे उड्डाणे

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी ॥
गडबडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी ।
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ॥ १ ॥

जय देव जय देव जय हनुमंता ।
तुमचे नि प्रसादे न भी कृतांता ॥ ध्रु० ॥

दुमदुमिली पाताळे उठिला प्रतिशब्द ।
थरथरला धरणीधर मानीला खेद ॥
कडकडिले पर्वत उड्डगण उच्छेद ॥
रामी रामदासा शक्तीचा बोध ॥ जय देव० ॥ २ ॥

आरती शब्द मराठी माती येथून घेतले आहेत

उत्कट साधुनि शिळा

उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनी ।
लिंगदेह लंकापुरि विध्वंसूनी ॥
कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।
देह-अहंभाव रावण निवटोनी ॥ १ ॥

जय एव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्णकामा ॥ ध्रु० ॥

प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला ।
लंका दहन करुनी अखया मारिला ॥
मारिला जंबूमाळी बुवनी त्राहाटीला ।
आनंदाची गुढी घेउनिया अला ॥ जय० ॥ २ ॥

निजबळे निजशक्ति सोडविली सीता ।
म्हणुनी येणे झाले आयोध्ये रघुनाथा ॥
आनंदे वोसंडे वैराग्य भरता ।
आरति घेउनि आली कौसल्या माता ॥ जय० ॥ ३ ॥

अनुहतवादित्रध्वनि गर्जति अपार ।
अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ॥
अयोध्येसी आले दशरथकुमार ।
नगरी होत आहे आनंद थोर ॥ जय० ॥ ४ ॥

सहज सिंहासनी राजा रघुवीर ।
सोहंभावे तया पूजा उपचार ।
सहजांची आरती वाद्यांचा गजर ।
माधवदासा स्वामी आठवे ना विसर ॥ जय० ॥ ५ ॥

आरती शब्द मराठी माती येथून घेतले आहेत

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ॥
नेती नेती शब्दे नये अनुमाना ।
सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता ।
आरति ओवाळीता हरली भवचिंता ॥ ध्रु० ॥

सबाह्य-अभ्यंतरी तूम एक दत्त ।
अभाग्यासी कैची कळेल ही मात ॥
पराहि परतली तेथे कैचा हा हेत ।
जन्मरणाचा पुरलासे अंत ॥ जय० ॥ २ ॥

दत्त येऊनिया उभा ठाकला ।
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला ।
जन्मरमरणाचा फेरा चुकवीला ॥ जय० ॥ ३ ॥

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ।
हारपले मन झाले उन्मन ॥
मीतूपणाची झाली बोळवण ।
एकाजनार्दनी श्रीदतध्यान ॥ जय देव० ॥ ४ ॥

आरती शब्द मराठी माती येथून घेतले आहेत