
सुरेख मेसेज, का कुणास ठाऊक, पण व. पु. यांचाच असावा असे वाटते.
थोडक्याच शब्दात जीवनातील आनंदाचे रहस्यच उलगडून दाखविले आहे.
शुभ्र दही
पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं, खायचा मोह होतो.
पण चमचा बुडवला, की दही मोडणार, थोड्या वेळाने चोथापाणी होणार, हे ठरलेलं!
पण म्हणून मी ते मोडलंच नाही तर?
दिवसांखेरी, ते आंबट होऊन जाईल.
अजून काही दिवस तसंच ठेवलं, तर खराब होऊन जाईल.
मग उपयोग काय त्या मस्त लागलेल्या दह्याचा?
मनात विचार आला, आयुष्याचंही असंच असतं … नाही का ?
दह्यासारखं ‘set’ झालेलं आयुष्य, नक्कीच आवडेल !
पण ते आयुष्य तसंच set राहिलं, तर त्यातली गोडी निघून जाईल.
सपक होईल. …. वायाच जाणार ते.
त्यापेक्षा रोजच्या रोज, आयुष्याचं दही नव्यानं विरजायचं.
आयुष्याची गोडी चाखायला तर हवीच !
आयुष्य जगायला तर हवंच !
दिवसभर ते दही वेगवेगळ्या रूपामध्ये अनुभवायचं !
कधी साखर घालून, तर कधी मीठ,
कधी कोशिंबिरीत, तर कधी बुंदीत,
तर कधी कोणत्या ग्रेव्हीत !
कधी जेवून तृप्त झाल्यावर ताक म्हणून !
मला ना, ह्या ताकाचा …
हवं तितकं पाणी सामावून घेण्याचा गुणधर्म फार आवडतो.
अर्थात, कुठचाही अतिरेक झाला, तर आयुष्य पांचटच होतं !
हरेक दिवसाच्या पदार्थ क्रियेची नजाकत वाढवता आली पाहिजे.
मात्र एक नियम कटाक्षाने पाळायचा !
पूर्ण दही संपवायच्या आधी,
रोज थोडं विरजण बाजूला काढून ठेवायचं !
‘उद्याचं’ दही लावायला !
मग रात्री झोपण्यापूर्वी, दिवसभरात जगलेल्या उबदार क्षणांनी,परत नव्यानं दही विरजायचं. #मा_आ_वि #दही #आयुष्य
Tweet
मला ठाऊक आहे … रोज ही भट्टी जमेलच असं नाही.
पण नासलंच समजा कधी,
कडवट झालंच समजा कधी,
तर नाउमेद न होता, नव्यानं सुरुवात करायची.
मग त्याकरता दुसर्याकडून विरजण मागायची वेळ आली … तरी त्यात कमीपणा नसतो.
पण ‘दही’ मात्र रोजच्या रोज ताजंच लावायचं !
आयुष्य कसं ‘चवीनं ‘ जगायचं !!!
लेखक: अज्ञात (WhatsApp वरून)
Posted by manasi godbole on ऑक्टोबर 10, 2020 at 5:54 pm
चला तर मग रोज ताज्या घट्ट गोड दहयासारखं आयुष्य जगूया
LikeLiked by 1 person
Posted by vivsa on ऑक्टोबर 10, 2020 at 6:12 pm
हा हा हा .. मग चमचा चमचा “कवड” > खाऊ
LikeLiked by 1 person
Posted by Nikhilesh Godbole on ऑक्टोबर 25, 2020 at 3:10 सकाळी
मस्त, दही आणि विरजण
LikeLike
Posted by vivsa on ऑक्टोबर 25, 2020 at 8:19 सकाळी
हो ना. या विचाराने प्रेरित होऊन / वाचून मी दही आवर्जून खातोय… 🙂
LikeLike