लेखकाचे संग्रह-दफ्तर

रजनीकांत – एक सुप्रसिद्ध वादळ

खालिल लेख मला माझ्या भावाकडुन अाला. मी रजनीकांतचा खुप मोठा चाहता नाही, पण एक मराठी भाषिक असल्याकारणाने, रजनीकांत (शिवाजी राव गायकवाड) यांच्या प्रसिद्धीचे वादळ, मराठी मनावर कसा परिणाम करते अाहे याचे सुंदर वर्णन करणारा हा लेख मला खुप जवळचा वाटला.

हा लेख सुरुवातीला रजनीकांत (रजनी) यांच्या पडद्यावरच्या अभिनेत्याचे जनसामान्याच्या मनातील प्रतिमेचे सुंदर चित्रण करुन मग, मुख्य मुद्याकडे वळतो. मराठी चित्रपटांचा उंचावणारा दर्जा, सामान्य मराठी माणसाचे चित्रपटाकडे अौदासीन्य अाणि यातुन मराठी चित्रपटाला अाकर्षक व झगमगीत करण्याचे निर्मात्यांचे प्रयत्न पुढील संभाषणातुन अतिशय प्रंजळपणे व्यक्त होते. रजनीच्या व्यक्तीचित्राची उंची दाखवताना लेखकाले वापरलेली Phantom च्या Old Jungle Saying’s ची लकब या लेखात अतिशय चपखलपणे बसली अाहे. संपुर्ण लेखभर New Rajni Sayings पेरताना “इन्फिनिटीला झिरोनं डिव्हाईड”, “घोड्यावर रागवून मारलेला पंच”, “(+ / -) वेव्जच्या टक्कर”, “परतीचा पाऊस”, “आईन्स्टाईन सोबतची अार्ग्युमेंट” इत्यादी कल्पना चोखंदळपणे वापरताना एकंदरीत लेखकाचा बहुश्रुततेतुन अालेला अनुभव दिसतो अाहे.

हा लेख वाचताना, तुम्हाला माझ्या वरील विवरणाचा प्रत्यय नक्की येइल.

टीप: खालिल लेख माझा नाही.


रजनीचा रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. खरं तर आपण जमिनीवरच झोपतो, अजूनही जुनाच ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल वापरतो, साधी कार वापरतो एवढंच नाही तर इतर कलाकारांसारखे विग लावून हिंडत नाही. तरी सुद्धा आपण एवढे अस्वस्थ का हे काही त्याला कळलं नाही. तरी बरं त्यानं झोपण्यापूर्वी एकदा नाही तर दोनदा इन्फिनिटीला झिरोनं डिव्हाईड करून बघितलं होतं आणि दोन्हीवेळा उत्तर सारखंच आलं होतं!


काय बरं झालं असेल? की काही शतकांपूर्वी आपण एका घोड्यावर रागवून त्याच्या तोंडावर खालून एक बॉक्सिंग पंच मारला होता आणि नंतर त्याच्या पुढच्या पिढ्या स्वत:ला जिराफ म्हणवून घेऊ लागल्या होत्या. त्यांचे तळतळाट तर नसतील? पण आपल्याला कुणाचे तळतळाट लागणार आहेत? आपल्या दिशेनं आलेल्या निगेटिव वेव्जना तर आपण नुस्त्या नजरेनं पॉझिटिव करून टाकतो आणि पुढच्या येणा-या निगेटिव वेव्जच्या दिशेनं पाठवतो. नंतर त्या दोन्ही वेव्जची टक्कर होऊन प्रकाश आणि आवाज तयार होतो, काही मूर्ख लोक त्यालाच ‘विजांचा कडकडाट’ असंही म्हणतात, त्याला आता आपण काय करणार? त्यामुळे या शक्यतेलाही काही अर्थ नव्हता. पण झोप येत का नाहीये याचं उत्तर त्याला काही केल्या उत्तर सापडेना.


तेवढ्यात त्याचा फोन वाजला. (आपण तर मिस्ड कॉल्सनाही उत्तर देऊ शकतो, त्यानं मनात विचार केला!) त्यानं डाव्या हातानं फोन उचलला आणि आणि उजव्या हातात फेकला. फेकतानाचा त्याचा अँगल एवढा नेमका होता की हवेच्या प्रेशरमुळे त्याची ‘आन्सर की’ बरोब्बर प्रेस झाली आणि पलिकडला ‘हलो’ ऐकायला आला. एवढ्या रात्रीच्या त्या ‘हलो-हलो’ला हलकट उत्तर द्यावं, असं त्याला वाटलं पण त्याने नुस्ताच हुंकार दिला.

“सायेब, एक मराठी पिच्चर प्रोडूस करतुय त्याबाबद तुमच्याशी बोलता यील ना आत्ता?”


“मला कोणत्याही वेळी बोलता येतं. मी व्हॅक्यूम मध्ये सुद्धा बोलू शकतो”
“नायी, वाल्युम मोठाच आहे इकडं. पन रागावू नका जरा रातच्याला फोन केला. नाईट कालिंग हाफ रेट मध्ये पडतं ना. आमी प्रायोगिक निर्माते आहोत सायेब, पिच्चर करायचा म्हन्जे पैसे वाचवावे लागतात सर्वीकडे. तुमी मराठी पिच्चरमदी काम करायचं म्हनला म्हनून फोन केला”


“ते माहित्येय मला. काय स्टोरी आहे तुमची?”
“ष्टोरी तुमी म्हनाल ती”


“पण तुमच्या डोक्यात काहीतरी असेल ना?”
“गरीबाला कसली आलीय ष्टोरी न् बिरी सायेब. गावाकडची मान्सं, एक चांगला शेतकरी आन् त्याच्या चांगल्या बायकोचा हात धरनारा बाराचा सरपंच. घरात म्हातारी सासू आन् तमाशाला जानारा दीर आसलं कायतरी जुगाड असतं सायेब आमचं. तुमी आमच्या पिच्चरमदी काम करा तुमाला पायजे तो रोल करा, हवं तर समदे रोल तुमीच करा पन तुमची ती ष्टाईल आमच्या गावाकडं लई आवडते पब्लिकला तेवडं जमवा सायेब.”


“डिरेक्टर कोण आहे?”
“शंकर”


“शंकर? त्याच्यासोबत मी लेटेस्ट रोबो केला तो पण मराठी सिनेमा करतोय?”
“न्हाई तो तुमचा शंकर न्हायी सायेब, आमचा शंकर, शंकर विसपुते. ‘सडा निळ्या कुंकवाचा’ला असिश्टन होता तो सायेब, सातवा. पन तेवडं गागलवाल्या ष्टाईलचं जमवा.”


“बरं”
“आन् त्या गागलवाल्या ष्टाईलमदे सायेब तुमी गागल वर फेकून डोळ्यावर बशिवता तेवा वरून खाली पडताना तो मोडत आसंल ना कदीमदी?”


“हो मोडतो बरेचदा. त्याचा रिटेक घेतो मग आम्ही”
“आन् मग गागल तुमी आन्ता का आमाला द्यावा लागंल? न्हायी, रागवू नका सायेब पन आसले रेबानचे चार गागल तुमी मोडले तर बसला का चार चोक सोळा हजाराला बांबू आमाला?


“अरे पण प्रॉपर्टी तर तुम्हालाच द्यावी लागेल ना?”
“आमी फार तर तुमच्या बिडी फेकन्याच्या ष्टाईलसाठी शिवाजी बिडीचं एक बंडल देऊ. हवं तर माचिसचा आख्खा बॉक्स आनू नवा कोरा. पन काय सायेब आमालाबी परवडलं पायजेल ना? आनि काश्चूम तुमचा तुमाला आनावा लागेल.”


“कमाल झाली तुमची..”
“तसं नाय सायेब, पन अशोक शिंदेसाठी शिवलेली कापडं तुमाला नाई बसली तर कम्परटेबल वाटनार नाई तुमालाच. आपली कापडं आपल्याबरोबर आसलेली बरी, कसं म्हंता?”


“जेवायला तरी घालाल की घरून डबा आणावा लागेल?”
“काय सायेब गरीबाची थट्टा करता? जेवायला घालू की आमी. काय पांढरा म्हना, तांबडा म्हना, पेशल रस्सा करू रोज. झालंच तर मोर, ससे काय पायजेल ते देऊ की. जेवनात मागंपुडं बघत नाई आम्ही सायेब. शेवटी तुमी काय नि आमी काय, जे काय पैसे कमावतो ते दोन वेळच्या जेवनासाठीच ना? मग त्यात कसली कंजूशी करायची सायेब?”


“आणि पेमेंटचं काय?”
“पेमेंट कॅश करतो की रोजच्या रोज आमी”


“नशीब माझं. पण किती देणार?”
“मोट्या हिरोला जेऊनखाऊन बारा देतो आमी रोजचे, तुमाला साडेबारा देऊ सायेब”


“रोजचे साडेबारा लाख फक्त?”
“लाख नायी, हजार सायेब. साडेबारा लाखात तर आमचा पिच्चर कंप्लेट होतो सायेब”



एवढं ऐकल्यावर रजनीनं एवढ्या रागानं मोबाईलवरचं लाल बटन दाबलं की त्या प्रेशरमुळे पलिकडच्या मोबाईलवर बोलणा-या निर्मात्याचे डोळे आले! गावात डोळ्याची साथ नसतानाही फक्त आपल्या एकट्याचेच डोळे कसे आले या शंकेनं पुढे अनेक दिवस तो बेजार होता म्हणतात. (हे वाचतानासुद्धा काही कमजोर वाचकांचे डोळे येऊ शकतात त्याला रजनी किंवा आम्ही जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.)


फोन झाल्यावर रजनीच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. (त्याच्या डोक्यात एकदा प्रकाश पडला की आसपासच्या सतरा जिल्ह्यांचं लोडशेडींग एक महिन्यासाठी बंद होतं!) त्याला एकदम झोप न लागण्याचं कारण लक्षात आलं. ‘रोबो’च्या प्रमोशनच्या नादात आपण बाळासाहेबांना भेटलो आणि मराठी सिनेमात काम करायची इच्छा असल्याचं जाहीर केलं तेव्हापासून त्याला असल्या ऑफर्स येत होत्या आणि त्याची झोप उडाली होती, अस्वस्थ वाटत होतं. (परिणामत: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला) त्याला वाटलं मराठी सिनेमांची एवढी लाट आली, ऑस्करला मराठी सिनेमे जाताहेत, राष्ट्रीय पुरस्कार पटकावताहेत तेव्हा असेल त्याला मार्केट. पण निर्मात्यांच्या बजेटचे आकडे ऐकल्यावर त्याला दरदरून घाम फुटला.(…आणि हवामान खात्याच्या मेधा खोले म्हणतात परतीचा मान्सून!)


मराठी सिनेमाचं एकूण बजेट जेवढं असतं तेवढा खर्च आपल्या सिनेमात फक्त मेक-अप वर होतो आणि आपल्या सिनेमातल्या मेक-अप वर आपण जेवढा वेळ घालवतो साधारण तेवढ्या वेळात अख्खा मराठी सिनेमा पूर्ण होतो हे सूत्र त्याच्या लगेच लक्षात आलं. (एका निर्मात्यानं त्याच्या ‘शिवाजी द बॉस’ हा सिनेमा मराठीत डब करायचे हक्क मागितले होते. त्यानं तो चित्रपट बघितलाही नव्हता पण तो म्हणाला आमच्याकडे केवळ नावावर हा सिनेमा चालेल!)


मग तो हे आठवायला लागला की बाळासाहेबांच्या भेटीनंतर ‘मराठी सिनेमात काम करायची इच्छा आहे’ हे बोलायची आयडिया आपल्याला दिली कुणी? कदाचित असं झालं असेल की पत्रकार परिषदेत प्रश्न वगैरे विचारायचे असतात, असल्या जुनाट कल्पना डोक्यात घेऊन जर्नालिझम स्कूलमधून नुकत्याच बाहेर पडलेल्या एखाद्या अतिउत्साही पत्रकारानं किंवा आपल्या हातात काळं कणीस आहे तेव्हा आपण कुणालाही काहीही विचारू शकतो अशा अतिआत्मविश्वासू पत्रकारिणीनं आपल्याला ‘तुम्ही मराठी चित्रपटात काम करणार का?’ असा प्रश्न विचारला असेल आणि मुंबईत राहून या प्रश्नाला ‘नाही’ असं उत्तर देता येत नाही एवढं कळण्याचा कॉमन सेन्स आपल्याला असल्यामुळे आपण ‘हो’ असं उत्तर दिलं असेल आणि मग लगेच त्याची ‘रजनी करणार मराठी चित्रपटात काम’ अशी ब्रेकींग न्यूज झाली असेल…


…की हे आपणच आपणहून बोललो? कुणी बरं असं बोलायची आयडिया आपल्याला दिली असेल? रजनी विचार करू लागला. त्याच्या साध्या चालण्याचा वेगसुद्धा प्रकाशाच्या वेगाच्या जास्त असतो (आईन्स्टाईन आणि त्याचं याच विषयावर वाजलं होतं. रजनीच्या ऑर्ग्युमेंटनं आईन्स्टाईनच्या डोक्यावरचे केसही विस्कटले होते. ते नंतर कधीच सरळ झाले नाहीत. आज आईन्स्टाईन आपल्यात नाहीत. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो!)


त्यामुळे त्याचा विचार करण्याचा वेग एवढा प्रचंड होता की पहिला विचार इष्ट स्थळी पोचायच्या आत मागचा विचार त्याला येऊन भिडत होता. आणि ही प्रक्रिया एवढी प्रचंड वेगात चालू होती की स्टीफन हॉकिंग्ज तिथे असते तर बिग बँगचं गूढ सहज उकलता आलं असतं. पण रजनीच्या दृष्टीनं त्याचा परिणाम एवढाच झाला की त्याला गाढ झोप लागली. अगदी गाढ.


(वरील माहिती आमच्या मते शंभर टक्के खरी आहे. जिज्ञासूंनी खुद्द रजनीदेवाला मेल करून खात्री करून घ्यावी. त्याचा ईमेल आयडी- [email protected])

मनस्ताप निवारण व्याख्यान फलस्वरुप

काल नीता आणि तिच्या मैत्रिणी, महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित, मनस्ताप निवारण व्याख्यान ऎकायला गेल्या होत्या. व्याख्यानाची वेळ ७ ते ९ अशी होती. फलस्वरुप, वैदेह आणि अथर्व दोघे संध्याकाळी माझ्यासोबत होते. अथर्वचे बाबा कार्यालयातुन परत येण्यास दोन तास अवधी होता. या दोघांना “रोबो डिफ़ेन्स” खेळाचे धडाम-धुडुम आवाज ऎकवुन जवळ-जवळ ३० मिनिटे घालवली. तो पर्यंत दोघेही विमान उडवण्याच्या इच्छेने प्रेरित झाले होते. एकीकडे माझे जेवण मी उरकुन घेतले, रात्रीचे ७:३० (:-). दोघांना भुक लागली नसल्या कारणने, मात्र एक-दोन बिस्कीटे खायला घातली. तेवढ्यात श्लोक म्हणण्याची कल्पना वैदेह आणि अथर्व, दोघांना पसंत पडली. एका मागुन एक दोघे श्लोक म्हणु लागले. याची परिणिती खालील चलचित्रात झाली.

पुढे खाली जाउन विमाने उडवण्याचा खेळ जवळ-जवळ एक तास रंगला. मग सुमारे ८:४५ वाजता अथर्वचे बाबा आल्यावर दोघे आपापल्या घरी गेले. आणि माझ्या अजुन एक रंगतदार दिवसाची पुर्ति झाली.

Ganapati 2010, MMS – जय जय महाराष्टृ माझा

“Marathi Ase Amuchi MAyboli…”
“मराठी असे अामुची माय बोली…”

Ever since “ज्ञानेश्वर माउली” “Dnyaneshwar Mauli” proclaimed richness of Marathi language in the 12th century over the prevalent Sanskrit lanugage there has been huge support and acceptance all over Maharashtra and neighbouring areas for Marathi language. Today’s new Marathi generation is gone to places where Marathi has never been before.

We do not hear Marathi in daily business / commercial use outside Bharat, yet the new (12+) and newer(5+) generations who use Marathi at their homes are thrilled to hear use of Marathi in public places, going over trains, shopping malls. There is an exchange of smiles and possibly a short conversation and always link for closeness is established to the fellows who speak the same at their homes, when they meet each other.

Its a pleasure to share this video showing Jai-Jaikar of Maharashtra and young blood dancing to tunes of Maharashtra Majza.

Ganapati 2010, MMS – डेरे डेरे डोलु बावरिया रे

This is yet anther fantastic performance by these gorgeous ladies from Choa Chu Kang Community at Singapore. I have seen progress everyday. The steps and the formations. More than two months of effort has gone into this 4-5 minute dance. I remember hearing Neeta over phone to fix up the last week of shopping for the dresses and ornaments… that created a lot of excitment

But its all is counted in as the crowd goes crazy and asks for ONCE MORE….


हिंदी बोल स्पर्धा

Vaideha Sathe wins Hindi elocution competition at Yuvabharati School.

Subject: 

“हम है तारे ज़मीं के” or “Hum hai Tare Jameen ke…”

Here goes the script in Hindi:

अादरणीय गुरुजन अौर मेरे प्यारे दोस्तों नमस्कार। अाज़ मैं बहुत खुश हुं कि मुझे मेरे विचार अापके सामने प्रकट करने का मौका दुबारा मिला है।

अाज़ का विषय भी बडा निराला है “हम है तारे ज़मीं के” … क्या तारे भी ज़मीं पर अा सकते है? अंधेरी रात मे दुर अासमान मे टिम-टिम करते तारे कितने लुभावने लगते है! क्या मैं इन तारो के साथ भी कभी खेल सकता हुं? ये सोचते हि मुझे याद अाते है मेरे दोस्त।

हर शाम मैं अौर मेरे खेल के मैदान पार हसी खुशी से खेलते है। पुरा माहौल हमारी हसी खूशी से गुज़ जाता है। तभी मेरी मां कि चेहेरे पर झलकती खुशी देख कर मै यकिन के साथ कह सकता हुं कि “हां, हम हि है तारे ज़मीं के”

Transliteration:

Adaraniya Gurujan aur mere pyare doston namashkar. Aaj mai bahut khush hun ki mujhe mere vichar aapke samne pragat karne ka mauka dubara mila hai.

Aaj ka vishay bhi bada nirala hai. Hum hai Tare Jameen ke… Kya tare bhi jameen pe aa sakte hai? Andheri rat mai door aasmana mai tim tim karte tara kitane lubhavane lagate hai! kya mai in taron ke sath bhi kabhi khel sakata hun? ye shoch te hi mujhe yaad aate hai mere dost.
Har sham, mai aur mere dost khel ke maidan par hasi khushi se khel te hai. Poora mahol hamari hasi khushi se gunj jata hai. Tabhi meri maa ki chehare par jhalati hui khushi dekh kar mai yakin ke sath keh sakata hum ki han Hum hi hai Tare Jameen ke!
Thank to Yuvabharati School for sharing this photo of the competition with parents.

My journey with my young friends

Since last two three months, starting from November 2009, I am hooked on to going to VSS shakha regularly. After three four months now I have realized that I have missed less than 3 Sundays of shakha other than when I was on vacation in Thane. Now looking at this undeclared behavior pattern, why I am going so regularly to shakha? one thought comes to mind that is the young friends I have made since November. They all come to shakha before I reach and wait for me to begin the games. I have started liking the game session that we play. Initially we playedjust warm up games like Om chanting in one breath followed by one boy doing kabaddi service while others catch. Now a days playing kabaddi is a become the center point of our games session. But now a days I felt we are too focused on just one game. Hence we played football last time. And to my surprise, I was beaten by those young boys most of them age less than 10 years, at least a couple of times. I must say they are really good players full of nascent talent & potential. I am going to focus on how to cultivate more team games in them and bring out best within them.

Another Milestone Conquerred by ISRO: Indigenous Cryogenic Engine

ISRO to launch satellites by its own indigenous cryogenic engine

By Khabrein.Info Correspondent,

New Delhi, Feb 18, 2009: India’s ISRO is all set to launch satellites by its own indigenous cryogenic engine. Late last year India had completed final testing of its indigenously developed Cryogenic engine, giving a big boost to its space aspirations. It was the second biggest success for ISRO after Chandrayaan-1 launch.

ISRO crossed yet another major milestone in December last year by successfully conducting the Flight Acceptance Hot Test of Indigenous Cryogenic Engine at Liquid Propulsion Systems Centre’s (LPSC) Mahendragiri facilities on December 18, 2008. This Cryogenic Engine is identified for the first indigenously developed Cryogenic Stage to be used in the next Geosynchronous Launch Vehicle mission (GSLV -D3).

The indigenous cryogenic engine develops a thrust of 73 kilo Newtons (kN) in vacuum with a specific impulse of 454 seconds and provides a payload capability of 2200 Kg to Geosynchronous Transfer Orbit (GTO) for GSLV. The Engine works on ‘Staged Combustion Cycle’ with an integrated turbopump running at around 42,000 rotations per minute (rpm). It is also equipped with two steering engines developing a thrust of 2 kN each to enable three-axis control of the launch vehicle during the mission. Another unique feature of this engine is the closed loop control of both thrust and mixture ratio, which ensures optimum propellant utilisation for the mission.

The hot test was carried out for a planned duration of 200 seconds during which the engine was operated in the nominal and 13% uprated thrust regimes. All the propulsion parameters during the test were found satisfactory and closely matched with predictions.

Freedom of Expression or Just a Trade Off…

On 05-Feb-09, one of top commented article in Times of India made me think what is this article about and I turned away from that page. But then I on second thought I decide to leave N+1 comment on that article. I believe the comment will never be published as there is praise for Police and dispraise for Media. Non-the-less I thought to publish it here as my thought for today….

Below is the article followed by my thoughts….


Man assaults jeans-clad wife for dressing up like men

4 Feb 2009, 0401 hrs IST, Swati Sethi, TNN

SIRSA: In a brazen act of violence, reminiscient of the Shri Ram Sene goons in Mangalore, a man kicked and stamped his wife because she was dressed “as a man”

Adding insult to injury, the police promptly dispatched the battered woman, who suffered the ignominy in full public glare, to her in-laws house, terming it as a “family matter”. No case was filed.

The shameful episode was played out in the Dabwali market on Monday when a 23-year-old jean-clad girl accompanied her parents on a shopping expedition. “She was accosted by her livid husband and beaten for ‘bringing a bad name to the family”.

He kept screaming at her “Is this the way women from respectable families dress?” a shopkeeper, who witnessnessed the incident and helped rescue the girl, said. A PCR van which reached the spot, took the couple to the police station, he added.

“We summoned the boy’s father and his relatives from nearby Bading Khera village and let them take the couple home on an assurance that there would be no more beatings. Besides, it is a family dispute and can be resolved by counselling the husband-wife duo who are graduates,” Joginder Singh, SHO, city police station at Dabwali, told TOI.

However, the incident has sparked off a raging debate. Shreya, student of advertising, management and public relations department of Guru Jambheshwar University of Science and Technology, Hisar, claimed, “Dress has nothing to do with family repute or disrepute. Even boys wear earrings and keep flowing hair.”

Striking a more strident note, Jagmati Sangwan, state president of All India Democratic Women’s Association, said, “The police ought to have booked the husband for assault and under the Domestic Violence Act.”


My View:
I assume that both Man and Woman in this case hold the same definition of Respect and Society.

Man seems to be believing in a society where women are looked upon as Respectable Icon of a Family and is expected to carry the Iconic Emblem by her Appearance, Behavior and Character all together.
Woman seems to be believing in a society where Appearance may not be the Top significant criteria for displaying Respect.

There is a disconnect in expectations of the two. Hence is the social display of disgusting rage.
Very simplified way of looking at the gist of the news. But is that all? It reflects many more things not just the dilemma of the two individuals involved for right of freedom to express vs the display respectfulness.

(1) Clashes between Individuals with different mindsets is always a right thing to happen. The manner in which it is displayed depends on the local culture of the society. Now this is very very local and may change if you move out of a residential area of circle with a radius 5 KM. In Metros one may file for Divorce and decide to stay away. In same Metro one may decide to Kill Other Person or Hit and Kick. It all depends of how the individuals sees it right from his social upbringing and surroundings. At this time we have to accept that Bharat is such a country where Diversity is the foundation and cannot be eliminated make what one individual or a complete Official System May Try and Do. Same Rule cannot be applied to each and every case.

(2) Notice the reaction of Police. They have classified it as family and not reported any case. This is very very practical and simple reaction to all that I am trying to explain in the point 1 above. The underlying reason for Police to take this action could be anything but the result is the same. The clashes between two individuals especially a couple married to each other is strictly a family affair.

(3) Now why is Media bringing this up to the national level. There is Debate Value in the subject that can possibly enrage individuals and that way creating more news. Is that kind of news good for health of society? Does media officials thing of value that the news is going to bring to society before publishing it?

(4) Media should visit schools, public / private sports complexes, cultural foundation programs and keep publishing their results of GOOD work done by our people and publish it. What is result? There may not be direct “more news” value into it. But for sure it will inspire more and more individuals to think of exploring his or her “constructive aspirations” as opposed to the “rage” in earlier scenario where there is “more news value”. Aspiration to do something like a winning sports person did or a vocalist did will certainly earn more Medal to aspirant Bharat than enraged Bharat.

My Suggestion
I am suggesting Media to run a Good-New-Section (GNS) for each city and give that GNS section higher publicity. By doing that media would have created social value and it the value will be much much more than the news value that is targeted by publishing such low-social-value but high-news-value news.

नुतन वर्षाभिनंदन २००८

May this year be like the Ray-of-Light coming from the darkness of a freezing night…
And it may take a tough, tiring climb to see such a desirous ray-of-light … I wish each one of us be empowered
to make it to the top

From Matheran

(Pictured clicked in Jun-07: Industry was firing full throttle… Hope there is Ray of Light that show us the top again soon…)

New Year wishes to you and your family,

Vivek, Neeta & Vaideha Sathe

स्वानंद

दिनांक ८ नोवेंबर, २००८, आज मी असे काही केले की जे करताना मला, कुमारभारती, १० च्या “स्वानंद” धड्याचा अनुभव आला.
स्वतःच्या हाताने काहि तरी तयार करुन ते आपल्या मुलाला खेळायला देणे…

अमुल दुधाचा खोका – रथ

आणि रथ तयार झाल्यावर त्याच्याशी खेळतान वैदेहला पहाणे हा त्या स्वानंदाच्या पुर्तीचा दाखला.

आज मी असे काही केले की जे करताना मला, कुमारभारती, १० च्या “स्वानंद” धड्याचा अनुभव आला.